लोणावळा (जि. पुणे ः मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. तोडगा निघाला नाही. बैठक निष्फळ झाली आहे. आम्हालाही मराठा आरक्षणावर Maratha Reservation काढायचाय, तोडगा काढायचाय, पण आम्हाला आरक्षणच मिळणार आहे. इथे प्रश्न मिटत असला तर तेथे जायची हौस नाही. आता परत शिष्टमंडळ येणार आहे. आले तर येऊ द्या, तोपर्यत मुंबईकडे चालत राहू असे सांगत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंदोलनावर ठाम असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar यांनी स्वतः येऊन चर्चा करावी…
Read Moreमदत करणे बेतले सचीन मंडलेचा यांच्या जीवावर
टाकळी ढोकेश्वर (जि. अहमदनगर) ः अहमदनगर- कल्याण महामार्गावर बस-ट्रॅक्टर व कार अशा तीन वाहनांच्या विचित्र अपघात झाला. त्यात टाकळी मानुर takli manur (ता. पाथर्डी येथील राहिवासी आणि शिरुर कासार shirur kasar (beed) येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेल्या सचीन मंडलेचा sachin mandlecha या तरुण व्यवसायिंकांचा अपघातात मृत्यू झाला. आधीच रस्त्यावर ऊसाची उलटलेली ट्रालीमधील ऊस बाजुला करण्यासाठी मदत करणे सचीनच्या जीवावर बेतले आहे. ठाण्याकडून येणाऱ्या एसटीने सचीनच्या गाडीला धडक दिली आणि मदत करणाऱ्या सचीनला जीव गमवावा लागला. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी फाट्यावर काल (बुधवारी) ऊसाचा ट्रक्टर, चारचाकी वाहन आणि एसटी यांचा विचित्र अपघात झाला.…
Read Moreपुण्यातील जाणाऱ्या पदयात्रेचा मार्ग बदलणार
पुणे ः मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटील manoj jaranje patil यांच्या पदयात्रेचा मार्गात बदल करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जरांगे पाटील यांना केलेली विनंती मान्य केली. आता शिवाजीनगर मधून जाणारी पदयात्रा आता पुण्यातून जास्तीत जास्त बाहेरुन जाणाऱ्या मार्गाने लोणावळ्याकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील manoj jaranje patil मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून लोक त्यांच्यासोबत पदयात्रेने मुंबईला जात आहे. तरुणांसह, महिला, ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. काल सोमवारी (ता. २२) पदयात्रा नगरहून…
Read Moreसग्या सोयऱ्यांची व्य़ाख्या स्पष्ट करा, ५४ लाख सापडलेल्या नोंदीचे प्रमाणपत्रे वाटा ः मनोज जरांगे पाटील
पुणे ः मराठा समाजाच्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्यांचे प्रमाणपत्रे वाटप करा, सग्या सोयऱ्यांची व्याख्या नेमकी काय असेल हे स्पष्ट करा, हीच आमची मागणी आहे. आम्हाला काय मुंबईला जायची आम्हाला हौस नाही. सरकार दुर्लक्ष करतय यांचे वाईट वाटतय, मोठा समुदाय असूनही त्यांनी दिलेला शब्द पाळत नाहीत. मात्र मी समाजाच्या पुढे जाऊ शकत नाही. आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही असे ठासून सांगत मराठ्यांना मुंबईत आडवणे एवढे सोपे नाही असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. Clarify the definition of true grains, share certificates of 54…
Read Moreमराठा काय असतो, ते दाखवून देऊ…..रॅलीतील सहभागी लोकांच्या कडवट प्रतिक्रिया
रांजणगाव (जि. पुणे) ः मराठा समाजाचा केवळ राजकारणासाठी आतापर्यत पुढाऱ्यांनी वापर केला. ‘‘कुणबी म्हणून सरकारी दरबारी नोंद असेल तर कुणबी प्रमाणपत्र देण्याचा पन्नास-पंचावन्न वर्षांपासून नियम आहे. त्याबाबत सातत्याने आदेश निघाले, पण आता अधिक नोंदी सापडल्या म्हणून प्रमाणपत्रे द्यायला टाळाटाळ करत आहेत. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांची मागणी कुणबी प्रमाणपत्रे देण्याची आहे, तर सरकार वेगळ्या पद्धतीने मराठा समाजावर अन्याय करत आहे. सरकारमधील अनेक मंत्री, नेते मराठा आरक्षणाला विरोध करत आहे. अशांना मराठा समाज विसरणार नाही,’’ मराठा काय आहे हे आम्ही दाखवून देऊ, हे वादळ आता थांबणार नाही We will…
Read Moreशिवसेना नसती तर आयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती ः संजय राऊत
नाशिक ः देशात सर्वत्र राममय वातावरण आहे. मात्र शिवसेनेमुळेच राम मंदिर होत आहे. शिवसेना नसती तर राममंदिर झाले नसते. शिवसेनेच्या वाघामुळे काल पंतप्रधानाना पुजा करता आली. शिवसेना नसती काल अयोध्येत प्रभूरामाची प्राणप्रतिष्ठा झाली नासती. प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष पंचवटीत नाशिकमध्ये झालाय. श्रीरामाचे आणि शिवेसनेचे जुने नाते आहे असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.नाशिक येथे शिवसेनेचे पक्षप्रुमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अधिवेशन होत आहे. त्यात संजय राऊत यांचे भाषण झाले. रामाचा जो संयम आहे, तोच श्रीरामाचा संयम आहे. रामाचे धैर्य म्हणजे शिवसेनेचे धैर्य. रामाचे शौर्य ते शिवसेनेचे…
Read Moreभगवं वादळ…तरुणांचा उत्साह आणि मुक्कामी पोचायला झाला सहा तास उशीर
जरांगेच्या पदयात्रेतील लाखो मराठयांची नगरकरांकडून सेवाअहमदनगर, ः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा रविवारी (दिनांक २१) रात्री बाराबाभळी (ता.नगर) येथील मदरसा परिसरात मुक्काम होता. मिंडसांगवीपासून येथे येण्यापर्यत ठिकठिकाणच्या स्वागतामुळे आंदोलकांना मुक्काम गाठण्यास सहा तासाचा उशिर झाला. रात्री उशिरापर्यंत या दिंडीने करंजी घाटही ओलांडला नव्हता. मात्र, मध्यरात्रीपर्यंत त्यांची हजारो समाजबांधव सभास्थळी प्रतीक्षा करीत होते. आज (सोमवारी) नगर शहरापासून खराडी बायपास (पुणे) इथपर्यत जागोजागी स्वागत झाले. अंदोलकासाठी जागोजागी पाणी तसेच नाष्ट्याची सोयही करण्यात आली आहे. सुप्यात अंदोलकांना दुपारच्या जेवनाची सोय केली होती, मात्र सुप्यात जायला सांयकाळचे सहा वाजले,…
Read Moreमनोज जरांगे मायभूमी मातोरीत भावूक
मोतारी (जि. बीड ः ‘‘मी अनेक वर्षापासून मराठा समाजासाठी काम करतोय. प्रत्येक मराठा कुटूंब हे माझे कुटूंब आहे. कोट्यावधी मराठ्यांनी पाठबळ दिलय, आता मी माघे हटत नाही. मी असेन, नसेन लढा सुरु ठेवा,’’ असे सांगत मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील मायभूमी ‘मातोरी’त भावूक झाले. आई-वडील, भाऊ यांच्यासह सगेसोयरे, मित्रांनी गावांत स्वागत केले. महिलांनी औक्षण केले. मातोरीहून नगरला निघताना आई-वडील, भावांसह गावकरी पाहून मनोज जरांगे पाटील यांचे हृदय भरुन आल्याचे पहायला मिळाले. Manoj Jarange Patil, Maratha reservation, welcome to Morcha Mumbai मराठा समाजाच्या समाजाच्या आऱक्षणासाठी लढा सुरु असून लढ्याचे…
Read More“शिवछत्रपती आईच्या अर्ध्या वचनात होते” राजमाता जिजाऊ आईसाहेब
प्राचीन भारताचा इतिहासात काही स्त्रियांची नावे येतात. वैदिक परंपरेतल्या मैत्रेयी,गार्गी ते बौद्ध संस्कृतीतल्या आम्रपाली पर्यंत.मध्ययुगात परकियांच्या आक्रमणामुळे स्त्री वर्गावर बंधने घालण्यात आली.महाराष्ट्राचा विचार केला असता नेमक्या ह्याच काळात महाराष्ट्राचा मनू बदलला.. Know chhatrapati Sivaji Maharaj Mother Rajmata Jijau Biography शिवछत्रपतींचे अवघे आयुष्य म्हणजे महाराष्ट्राचा स्वभावधर्म .मग त्यात महाराजांचे “स्त्रीदाक्षिण्य” “न्यायप्रियता” नैतिकता सर्वच आले.जरा अधिक विस्ताराने विचार केला असता सहज दिसून येईल कि शिवछत्रपतींचा -राजश्री सिऊबाराजे ते छत्रपती श्री राजा शिवाजी हा प्रवास जिजाऊआईसाहेबांच्या भक्कम आधारावर झाला.भोसले-जाधवराव ह्या दोन्ही घराण्यात राजकारण होतेच पण वारश्याचा उपयोग “स्वराज्यलक्ष्मी “म्हणून प्रसन्न करण्यास जर कुणी…
Read More



